वांद्र्यात डेंग्युचा वाढता प्रभाव

  • पूजा भोवड & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

वांद्रे - वांद्र्यातल्या शासकीय वसाहतीत गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता करण्यात आलेली नाही. परिसरातील अस्वच्छतेमुळे इथले नागरिक हैराण झाले आहेत. याच परिसरात स्वच्छ भारत अभियानाचे कार्यालय आहे. मात्र याच परिसरात अस्वच्छतेमुळे डेंग्युचा प्रादुर्भाव वाढलाय. तर डेंग्युमूळे श्रूती नावाच्या एका 26 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला. अशा परिस्थितीत PWD च्या कार्यालयाला स्वच्छतेबाबत अर्ज देऊनही ही परिस्थिती जैसे थे च आहे. कोणीही या परिस्थितीला गांभीर्याने घेत नसल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी दिलीय. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या