धारवली पूल रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

अरूंद रस्ता आणि एका वेळी एकच वाहन जाण्याएवढी जागा. ही स्थिती आहे मढ आयलंड ते मुंबई शहराला जोडणारा धारवली पुलाची. अरुंद पूलाच्या रस्त्यामुळे सतत होणारी वाहतुककोंडी, प्रवासाला लागणारा विलंब यामुळे या परिसरातील नागरिकांकडून धारवली पूलाच्या रुंदणीकरणाची मागणी होऊ लागली आहे. मढ आयलंड ते मुंबई शहराला जोडणारा भास्कर भोपी रोडवर धारवली पूल आहे. गेले 70 वर्ष जुना असलेल्या या पुलाच्या रुंदीकरणाकडे अद्याप कोणत्याच सरकारनं लक्ष दिले नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अरूंद पुलामुळे या गावातील स्थानिकांना अनेक समस्य़ांना सामोरे जावे लागते. मढ आयलंडवर दिवसेंदिवस होणारी पर्यटकांची गर्दी, शूटिंगसाठी येत असलेले कलाकार यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. 

पुढील बातमी
इतर बातम्या