कच-याच्या ढिगा-यामुळे नागरिक त्रस्त

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

गिरगांव - गिरगांवमधील कुंभारवाड्यात असलेल्या भाजी मार्केटमध्ये नाल्यातून काढलेला कचरा गेले काही दिवस तसाच पडून आहे. तसंच त्या नाल्याच्या वाहत्या पाण्याचाही नागरिकांना सामना कराव लागत आहे. तसंच तिथल्या नागरिकांकडून कचराकुंडीऐवजी

रस्त्यावरील कच-याच्या ढिगात कचरा टाकण्यात येत आहे. या कच-यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलीय.ढिगा-याच्या बाजूला भाजीवाले सुद्धा बसतात.येथे जमा होणाऱ्या कचऱ्याच्या तुलनेत कचराकुंड्या अपुऱ्या पडत आहेत. परिणामी कचरा रस्यावरच जमा होतोय. मात्र या सर्व परिस्थितीकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय.

पुढील बातमी
इतर बातम्या