'केसरी मित्र मंडळ' बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • शहरबात

गणेशोत्सवात शिस्तप्रिय म्हणून ओळखली जाणारी केसरी मित्र मंडळ सज्ज झाले आहे. या मंडळाच्यावतीने यंदा श्री विष्णू भगवंताच्या वराह अवताराची कथा चलचित्रामार्फत दाखवण्यात येणार आहे. बाप्पाचे आगमन आता अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेश मंडपात आता कामाची लगबग वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच 10 दिवसांच्या काळात भक्तांना बाप्पाचे दर्शन घेताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेण्यासाठी मंडळ सतर्क झाले आहे.     

 

पुढील बातमी
इतर बातम्या