२० वर्षांनंतर अर्जुन रामपालचा संसार मोडला!

  • मुंबई लाइव्ह टीम & शिव कटैहा
  • बॉलिवूड

गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवुड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया वेगवेगळे रहात असल्याची चर्चा सुरू होती. शिवाय त्या दोघांमध्ये अजिबात पटत नसल्याचंही सांगितलं जात होतं. आता मात्र, त्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं आहे. अर्जुन रामपाल आणि पत्नी मेहर जेसिया यांचा २० वर्षांचा संसार मोडला असून त्यांचा घटस्फोट झाल्याचं समोर आलं आहे.

२० साल पहले की बात है...

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दोघांनी मीडियाला सांगितलं की, 'एकमेकांपासून वेगळं होण्याची हीच खरी वेळ आहे. गेल्या २० वर्षांत आम्ही खूप सुंदर आठवणी जमा केल्या आहेत. पण आता आम्हाला वाटतंय की आम्हाला वेगळं व्हावंच लागेल. मात्र तरी आम्ही कायम एकमेकांसाठी उभे राहू. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं, तरी हेच सत्य आहे.'

मुलींसाठी सोबतच प्रयत्न करणार

पुढे सांगताना ते म्हणाले, 'आम्ही एक कुटुंब आहोत. आमचं नातं जरी तुटत असलं, तरी आमच्यातलं प्रेम कायम राहणार आहे. आम्ही दोघं आमच्या मुलींसाठी कधीही एकत्र येऊ.' अर्जुन रामपाल आणि मेहरला माहिका(१६) आणि मायरा (१३) अशा दोन मुली आहेत. जेव्हा अर्जुन आणि मेहर वेगळे रहायला लागले, तेव्हा या दोन्ही मुली मेहरसोबतच रहात होत्या.

सुझेनमुळे झाला घटस्फोट?

अर्जुन रामपाल आणि सुझेन अर्थात अभिनेता ऋतिक रोशनची आधीची पत्नी सुझेन यांच्याच प्रेमसंबंध असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ४ वर्षांपूर्वी जेव्हा ऋतिक आणि सुझेन यांचा घटस्फोट झाला, तेव्हापासूनच अर्जुन आणि मेहरमध्ये तणाव वाढू लागले होते. त्यामुळे सुझेनच या दोघांच्या घटस्फोटाला कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.


हेही वाचा

ठरलं...नोव्हेंबरमध्ये रणवीर-दीपिकाचं लग्न!

पुढील बातमी
इतर बातम्या