अत्यावश्यक सामान तुमच्या दारी, उबर-फ्लिपकार्टची हातमिळवणी

कोरोनाव्हायरसचा वाढता प्रसार पाहता भारतात २१ दिवसांचं लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडू नयेत असे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. पण अत्यावश्यक सेवांसाठी लोकं घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाला ही परिस्थिती हाताळणं अधिक कठिण होऊन बसलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरपोच सामान पोहचवण्यासाठी उबर आणि ई-कॉमर्स साईट फ्लिपराक्टसोबत भागीदारी केली आहे. याआधी उबरनं बिग बास्केट आणि स्पेंसरसोबत हात मिळवला होता. कंपनीचं म्हणणं आहे की, या कठीण परिस्थितीत लोकांपर्यंत खाण्या-पिण्याच्या गोष्टींसोबतच गरजेचे सामान पोहचवायचं आहे. जेणेकरून त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही. या सोबतच सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचंही पालन करत आहोत.

उबरनं आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची ही भागीदारी बिझनेस-टू बिझनेस असेल. दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूला उबर आणि फ्लिपकार्टची सेवा मिळेल. उबर इंडियानं स्पष्ट केलं की, लोकांपर्यंत सामान पोहचवण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. डिलिव्हरी दरम्यान जेवढे पैसे येतील तेवढे त्या ड्रायव्हर्सलाच दिले जातील.

उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे डायरेक्टर प्रभजीत सिंह म्हणाले की, यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत मिळेल. लोकांनी आपल्या घरातच रहावं, जेणेकरून या महामारीच्या चेनला तोडता येईल.


पुढील बातमी
इतर बातम्या