मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना समोर आली आहे. पालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) जाहीर केल्याप्रमाणे, शहरातील काही भागांमध्ये 30 तासांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
कधीपासून कधीपर्यंत?
5 मे (मंगळवार) सकाळी 10 वाजल्यापासून
6 मे (बुधवार) दुपारी 4 वाजेपर्यंत
ही तात्पुरती पाणी कपात नव्या वॉटर टनेल प्रकल्पाच्या कामासाठी करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणीपुरवठा अधिक कार्यक्षम आणि सुरळीत होणार असल्याचे BMCने सांगितले आहे.
📍 कोणत्या भागांवर परिणाम?
F/North: माटुंगा, सायन, वडाळा
F/South: परळ, शिवडी
L Ward: कुर्ला, साकीनाका
M/East: गोवंडी, मानखुर्द
M/West: चेंबूर
N Ward: घाटकोपर, विद्याविहार
महत्त्वाची सूचना
BMCने नागरिकांना आवाहन केले आहे की, पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी पुरेसा पाणी साठवून ठेवावा, जेणेकरून गैरसोय टाळता येईल.
हेही वाचा