नवीन मतदारांचा फायदा कुणाला ?
वांद्रे - मतदार नोंदणी मोहिमेअंतर्गत उपनगर जिल्ह्यात आतापर्यंत 56 हजार 128 नवे अर्ज दाखल झाले असून, मतदार नोंदणी मोहिमेचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता.
नवीन मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी मतदार नोंदणी अभियान महापालिकेतर्फे राबवण्यात आले. यामध्ये ज्या अधिकाऱ्यांच्या विभागात किंवा ज्या सोसायटीमध्ये जास्तीत जास्त नव मतदारांची नोंदणी झाली, त्या सोसायटी आणि अधिकाऱ्यांना रोख बक्षीस आणि प्रशस्तिपत्रक महापालिकेतर्फे देण्यात येणार आहे.