मुंबईत (mumbai) मान्सूनच्या आगमनाला अधिकृतपणे विलंब झाला आहे. मुंबईत (mumbai rains) मान्सूनच्या आगमनाची अधिकृत वार्षिक तारीख 11 जून आहे, मात्र पुढील आठवड्यापर्यंत त्याच्या आगमनाची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.
"नैऋत्य मान्सून दक्षिण महाराष्ट्रात पोहोचला असून, पुढील चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तो दाखल होण्याची शक्यता आहे," असे भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) मुंबई संचालक बिक्रम सिंग यांनी सांगितले.
सिंग यांनी पुढे सांगितले की, किमान पुढील पाच दिवस मुंबईत मान्सून (monsoon) दाखल होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत आणि जोपर्यंत मुंबईतील मान्सूनचे वातावरण सामान्य होत नाही, तोपर्यंत तापमान निश्चितच जास्तच असणार आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या आगमनाच्या तारखेनंतर नऊ दिवसांनी, 4 जून रोजी भारताच्या दक्षिणेकडील राज्य केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल झाला.
हवामान विभागाने म्हटले होते की, जर मान्सूनची प्रगती सामान्यपणे झाली, तर तो सात ते दहा दिवसांत मुंबई आणि महाराष्ट्रात दाखल होईल.
त्यानुसार, महाराष्ट्राच्या (maharashtra) दक्षिण भागात मान्सून अधिक तीव्र झाला आहे, परंतु हे स्थित्यंतर अपेक्षेपेक्षा अधिक संथ गतीने झाले आहे.
दरम्यान, बुधवारी सलग चौथ्या दिवशी मुंबईत किमान तापमान 30°C नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 3.6°C ने जास्त होते. हे राज्यभरातील सर्वाधिक किमान तापमानही होते.
हवामान विभागाने (IMD) आठवडाभर मुंबई आणि महानगर प्रदेशात हलक्या पावसाचा किंवा वादळी पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी, पाऊस अजूनही पडलेला नाही आणि त्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढत आहे.
हेही वाचा