BMC ने बुधवारी पोइसर नदीच्या एका उपनाल्यावर असलेल्या 100 मीटर लांब पुलाचा पाडकाम करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
स्थानिकांनी आरोप केला आहे की, हा पूल लोअर आणि अपर कोळीवाडा यांना जोडणारा एकमेव ब्रिज आहे. त्यामुळे हा पूल पाडल्यास भयंकर ट्राफिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ब्रिजला तीन दशकांहून अधिक वर्ष झाली असतील. त्यामुळे हा ब्रिजने जीर्णावस्था गाठली आहे. हा ब्रिज कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) अंतर्गत येतो, यामुळे पाडकाम करणं आवश्यक झाले आहे.
“हा पुल विकास आराखडा 2034 चा भाग आहे, पण संरचनात्मक तपासणीत तो असुरक्षित आढळल्याने पाडकाम आणि पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे एक अधिकाऱ्याने TOI ला सांगितले.
रहिवाशांनी इशारा दिला की, पूल पाडल्यास कोळीवाडा भागातील नागरिकांची गैरसोय होईल. नागरिकांना समुद्रकिनारी असलेल्या रस्त्याने 700 मीटरचा फेरफटका मारून जावे लागले.
“अधिकाऱ्यांनी नागरिकांचा सल्ला घेतलेला नाही. तसेच ब्रिड पाडल्यास रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाला कठिण होऊन जाईल,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले आहे.
BMC ने सांगितले आहे की, ते दोन वर्षांत नवीन पूल उभारण्याची योजना करत आहे ज्यामध्ये पादचारी रस्ता, रेलिंग्ज अशा गोष्टींचा समावेश आहे.