मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर तक्रार मिळताच तातडीने तपास करण्यात आला. तक्रार सत्य असल्याचे आढळल्यानंतर संबंधित स्टॉलवर त्वरित कारवाई करण्यात आली.
मध्य रेल्वेने स्पष्ट केले की, रेल्वे स्थानकांवरील खानपान सेवा आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये अस्वच्छतेबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरण अवलंबले जात आहे. प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी सर्व स्थानकांवर नियमित तपासण्या केल्या जात आहेत.
प्रवाशांनी स्वच्छता, खानपान सेवा किंवा प्रवासी सुविधांबाबत कोणतीही समस्या आढळल्यास RailMadad प्लॅटफॉर्मद्वारे तक्रार किंवा अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्याबाबत आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली आहे.