गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी देशभरात तसेच मुंबईत दहीहंडी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. मात्र, मुंबईत रात्री 9 वाजेपर्यंत 107 गोविंदा जखमी झाल्याचे बीएमसीने सांगितले. यातील 14 गोविंदांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर 62 जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. 31 गोविंदावर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी बीएमसीने दिली असून रात्री ९ वाजेपर्यंतची आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत जखमी गोविंदांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ठाण्यात 17 गोविंद जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे प्रशासनाने सांगितले.
किती जखमींवर कोणत्या रुग्णालयात उपचार झाले
ठाण्यात 17 गोविंदा जखमी
ठाणे शहरात दहीहंडीदरम्यान झालेल्या अपघातात 17 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 11 जखमी गोविंदांवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले.
तर सहा जखमी गोविंदांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. एकाही गोविंदाला गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा