बुधवारी दुपारी सुरू झालेल्या आणि रात्रभर अविरतपणे सुरू राहिलेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rainfall) तलासरी, डहाणू (dahanu road) आणि पालघर (palghar) शहरासह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये पावसामुळे हाहाकार माजला असून, अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे.
जिल्ह्यात सोमवारपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता, परंतु बुधवारी दुपारी पावसाचा जोर अनपेक्षितपणे वाढल्याने हवामान विभागाने जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
संध्याकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. डहाणू आणि तलासरीमध्ये अतिवृष्टी झाल्याचे वृत्त आहे.
रातोरात बोर्डी, डहाणू आणि आसपासच्या परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी अनेक घरे आणि दुकानांमध्ये शिरले आहे.
घोलवड आणि उमरगाम, तसेच वाणगाव आणि डहाणू दरम्यानच्या रेल्वे पुलांवरून पाणी वाहू लागल्याने रेल्वे रुळ पाण्याखाली गेले. परिणामी, पश्चिम रेल्वेची (western railway) रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली.
मुंबईकडे (mumbai) जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पहाटेपासून गुजरातच्या बाजूला अडकून पडल्या. पश्चिम रेल्वेने अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या, काही गाड्यांचे मार्ग अर्धवटच थांबवले आणि उपनगरीय लोकल ट्रेनची सेवा वाणगावपर्यंत मर्यादित ठेवली (सेवा डहाणूपर्यंतच मर्यादित केली).
उपनगरीय रेल्वे सेवा उशिरा धावल्या, तर पालघर-बोईसर (boisar) मार्गासह अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला.
पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आणि वीजपुरवठा वारंवार खंडित झाला.
हेही वाचा