वसतिगृहातील ४ जणींच्या जेवणाची गैरसोय होत असल्याची तक्रार १४ मे रोजी युवा सेनेच्या अधिसभा सदस्य शीतल देवरुखकर-शेठ यांनी विद्यापीठाकडे केल्याचं समजतं. मात्र, याकडे लक्ष न दिल्यानं शीतल यांच्या सूचनेनुसार कुलाबा विधानसभा विभाग अधिकारी प्रथमेश सकपाळ व युवासैनिक पवन धोत्रे, यश काते, स्वप्निल महाडिक यांच्यामार्फत १ महिन्याचे अन्नधान्य आणि भाज्या पुरवण्यात आल्या.
लॉकडाउनच्या काळात मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात अडकलेल्या विद्यार्थ्यांना छात्रभारतीनं अन्नधान्य व दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप केले. विद्यापीठाच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमांतून शेकडो लोकांना अन्नवाटप केले जात आहे पण वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मात्र मोफत जेवण देण्याचा निर्णय प्रशासन अजून घेत नसल्याचे समजतं.