गणेशनगर खाडी परिसर झाला कचरामुक्त

  • योगेश राऊत & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गणेशनगर - कांदिवली पश्चिमेकडील गणेशनगर खाडी परिसरात कित्येक महिन्यांपासून साचलेला कचरा अखेर उचलला गेलाय. त्यामुळे स्थानिकांना मोठाच दिलासा मिळाला आहे. अस्लम शेख फाउंडेशन आणि स्थानिक नगरसेविका गीता यादव यांच्या प्रयत्नाने हा कचरा उचलला गेला. अस्लम शेख फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष मिश्रा, मस्तान खान, रज्जाक, नगरसेविका डॉ. गीता यादव आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी वार्ड क्र.28 मधील स्वच्छता करण्यात आलेल्या या खाडी परिसराची पाहाणीही केली.

पुढील बातमी
इतर बातम्या