चीनच्या वुहानमधून संक्रमणास सुरूवात झालेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात पाय रोवायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये देखील रुग्णांची संख्या वाढत आहेत. भारतामध्ये कोरोनाचे संक्रमण न थांबल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. केंद्र आणि राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेतच, पण त्याबरोबरच सरकारला सर्वांच्याच सहकायार्ची गरज आहे. त्याचप्रकारे आपण कोरोनाला हरवू शकतो.
अशा परिस्थितीत अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती सर्वांनाच घरी राहण्याचा सल्ला देत आहेत. मात्र काहीजण असे देखील आहेत, ज्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
रविवारी आनंद महिंद्रा यांनी काही ट्वीट करत कोरोना व्हायरस संदभार्तील महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला आहे. ते आपल्या ट्वीटमध्ये असं म्हणाले की, अनेक अहवालांनुसार असं आणि तज्जञांच्या मते असं म्हटलं जात आहे की भारत कोरोना व्हायरसच्या तिसर्या स्टेजमध्ये पोहोचला आहे, असं असेल तर करोडो लोकांच्या जीवाला धोका आहे.
मेडिकल इन्फ्रास्ट्ररवर देखील त्याचा वाईट परिणाम होणार आहे.
महिंद्रा यांनी पुढे म्हटलं आहे की, पुढील काही आठवड्यांमध्ये लॉक डाऊन केल्यास कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येत घट होईल. परिणामी मेडिकल सुविधांवरील भार सुद्धा कमी होईल. दरम्यान काही टेम्पररी हॉस्पीटल आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करणे गरजेचे आहे. महिंद्रा ग्रृपने व्हेंटिलेटर बनवण्यासंदर्भात कामाला सुरूवात केली असल्याचंही ते म्हणाले.