कल्याण पालिकेने Kalyan Dombivli Municipal Corporation 2 जून रोजी कल्याण आणि डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये 12 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. हवामान खात्याने यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता व्यक्त केल्याने पाणी बचतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
केडीएमसीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, एल निनो आणि इंडियन ओशन डिपोल (IOD) च्या परिणामामुळे यंदाचा मान्सून उशिरा येऊ शकतो. त्यामुळे 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर 14 मे रोजी जलसंपदा विभागासोबत बैठक घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्व महापालिका, Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) आणि इतर संबंधित यंत्रणांनी पाण्याचा वापर नियंत्रित करण्याचा निर्णय घेतला.
यानुसार, केडीएमसीच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमधून होणारा पाणीपुरवठा 2 जून रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहणार आहे.
कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण विभाग, मांडा-टिटवाळा, वडवली, अंबिवली, शहाड, अटाळी तसेच इतर गावांमध्ये पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. याशिवाय डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागांनाही 12 तास पाणी कपातीचा फटका बसणार आहे.
केडीएमसीने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून आवश्यक तेवढेच पाणी साठवून त्याचा योग्य वापर करण्यास सांगितले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, India Meteorological Department (IMD) च्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर 2026 या कालावधीत देशात, तसेच महाराष्ट्रात, सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच देशभरात कमी पावसाची 84 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा