राज्यातील (maharashtra) लाखो रेशनकार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने 3 लाख 33 हजार रेशनकार्ड (ration card) निष्क्रिय केले आहेत आणि या कार्डधारकांना धान्य वाटप तात्काळ थांबवण्यात आले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून रेशन न मिळालेल्या संशयास्पद रेशनकार्डधारकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे आता अनेक पात्र आणि गरजू कुटुंबांना रेशन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, सुमारे 3.33 लाख रेशनकार्डधारकांनी सहा महिन्यांहून अधिक काळ धान्य उचललेले नाही. यामुळे या कार्डधारकांच्या खरेपणाबद्दल शंका निर्माण झाली होती.
इतरत्र स्थलांतरित झालेल्या कुटुंबांची नोंदणी झालेली नाही. काही खोट्या माहितीच्या आधारे मिळवलेले रेशनकार्ड देखील रद्द करण्यात आले आहेत.
हे सर्व गांभीर्याने घेत राज्य सरकारने अशा निष्क्रिय रेशनकार्डवरील रेशन वितरण तात्काळ थांबवले आहे आणि ते रद्द केले आहे. यामागील मुख्य उद्देश खऱ्या गरजू नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या पात्र कुटुंबांना लाभ देणे हा आहे.
एकट्या पुणे (pune) शहरात 8 लाख 73 हजार रेशनकार्डधारक आहेत. मोठ्या संख्येने रेशनकार्ड वापरले गेले नसल्याचे निदर्शनास आल्याने राज्य सरकारने अशा कार्डांचे वितरण थांबवून प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या कुटुंबांना ते देण्याचे आदेश जारी केले आहेत.
हेही वाचा