मुंबईत रात्रभर पावसाचा जोर कायम राहिला असून, मुंबईत बुधवारी ही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून मुंबई शहर आणि उपनगर तसेच ठाणे व रायगड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार या जिल्ह्यांतील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पालघर जिल्ह्यासाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पालघरमधील काही भागांत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
मंगळवारी दिवसभर कोसळणाऱ्या हलक्या सरी तसेच संध्याकाळनंतर वाढलेला पावसाचा जोर यामुळे मुंबईतील हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. मुंबईत तापमानाचा पारा २६ डीग्रीपर्यंत खाली येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मुंबई शहर व उपनगरांत मंगळवारी दिवसभर हलका पाऊस होता. संध्याकाळनंतर पावसाचा जोर वाढला. सुमारे ३ तास सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक सखल भागांत पाणी भरले आहे. गोरेगावमध्ये अनेक रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यांवर पाण्याचे मोठे लोट पाहायला मिळत आहेत.
मालाड, अंधेरी, खार, दादर या भागांतही पाणी भरले असून बेस्टने अनेक मार्गांवरील वाहतूक अन्य मार्गांवर वळवली आहे. मुंबई पालिकेने याबाबत ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
वाहतुकीच्या मार्गात बदल
मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत मुंबईत खालीलप्रमाणे सरासरी पाऊस झाला: