मुंबईसह परिसरात आज मुसळधार पाऊस पडल्याने मध्य मार्गावरील वाहतूक कोलमडली. त्यामुळे सीएसटीएम ते डोंबिवली दरम्यान लोकल सुरू होत्या. त्याच्या पुढील लोकल बंद करण्यात आल्या आहेत.
सेंट्रल रेल्वेसोबतच पश्चिम रेल्वेवर देखील प्रवाशांची गर्दी पाहायल मिळत आहे. स्टेशन परिसर खचाखच भरलेला आहे.
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते कल्याण दरम्यान वाहतूक खोळंबली होती. लोकल डोंबिवलीपर्यंतच धावत होत्या.
आता हळूहळू त्या पुढील मार्गावरही लोकल धावायला सुरू होत आहेत. पण यामुळे सीएसएमटी आणि ठाणे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र आहे.
सीएसएमटी ते कसारा दरम्यान रेल्वेसेवा आता सुरू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अडकून बसलेल्या प्रवाशांसाठी हा दिलासा आहे.