फायर सेफ्टीचे नियम धाब्यावर

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबईतील हजारो इमारतींनी फायर सेफ्टीचे नियम धाब्यावर बसवल्याचं समोर आलंय. आरटीआय कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी ही माहिती उघड केलीय. मुंबईमध्ये १ जानेवारी २०१० ते १० जून २०१६ या दरम्यान महापालिकेच्या अग्नीशमन दलाने तब्बल ८ हजार ८४० इमारतींचे इन्सपेक्शन केले. यांतील निम्या म्हणजे तब्बल ४ हजार ५९२ इमारतींनी फायरसेफ्टी नियंमांचे उल्लंघन केले आहे. पण यापैकी फक्त १४ इमारतींवर न्यायालयात खटले चालवले गेल्याची माहीती जितेेंद्र घाडगे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या