आचार संहिता लागू होऊनही विकासकामं सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कांदिवली - आचार संहिता लागू झाल्यानंतर नगरसेवक विकासकाम करु शकत नाही. पण, कांदिवली पू्र्वच्या अशोकनगर वॉर्ड क्रमांक 29 मध्ये अजूनही लादी आणि गटाराचं काम सुरू आहे. आचार संहिता लागून होऊनही वॉर्ड क्रमांक 29 चे काँग्रेसचे नगरसेवक रामआशिष गुप्ता हे मतांसाठी ही कामं करत असून स्थानिकांच्या समस्या देखील सोडवत असल्याचा आरोप स्थानिक रमेश गायकवाड यांनी केला आहे. गेल्या 4 महिन्यांपासून गटाराचं काम सुरू आहे. रामआशिष गुप्ता मात्र हे काम पालिकेकडून सुरू असल्याचा दावा करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या