वारंवार तक्रार केल्यानंतर पालिकेला जाग

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव -  वारंवार तक्रार केल्यांना पालिकेला अखेर जाग आलीय. गोरेगावच्या लक्ष्मीनगर परिसरात कॅनरा बँकेसमोरील रस्त्यावर  अनेक महिन्यांपासून मातीचे ढिग,कचरा,आणि धुळीचे साम्राज्य पसरले होते. याबाबत मनसे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी पालिकेला वारंवार पत्र व्यवहार केल्यानं अखेर पालिका प्रशासन जागं झालं आणि रस्ता डांबरीकरणाचं काम पालिकेनं सुरू केलं. वृद्धांना,महिलांना,लहानमुलांना या खराब झालेल्या रस्त्यामुळे चालताना त्रास होत होता. 

पुढील बातमी
इतर बातम्या