मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये प्रसिद्ध असलेल्या वरळी कोळीवाड्यातील किल्ल्याची डागडुजी करण्यात येणार आहे. कोळीवाड्याच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी वरळी किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्यात येणार असून, यासाठी ६३ लाख ४९ हजार रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
लवकरच वरळी किल्ल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. वरळीतील किल्ला हा पुरातन ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला आहे. या किल्ल्याची पाहणी केल्यानंतर स्थानिक शहर नियोजक, वास्तूविशारद यांनी त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी आराखडा जी-दक्षिण विभागाला सादर केला होता.
जी दक्षिण विभागानं आराखडा तयार करुन निविदा मागवली होती. त्यानुसार पुढील ६ महिन्यांच्या कालावधीसाठी ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे. 'देवांग कंस्ट्रक्शन' या कंपनीला किल्ल्याच्या डागडुजीसाठी ६३ लाख ४९ हजार रुपये दिले जाणार आहेत. किल्ल्याची जागा राज्य शासनाच्या सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग यांच्या अखत्यारित येत असल्याने त्यांचे ना-हरकत प्राप्त करण्यात आले आहे.
वरळी किल्ल्याची वैशिष्ट्यं