मुंबई पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केलं आहे.
मुंबई पोलिस आयुक्त तसंच कायदा व सुव्यवस्थेचे उपायुक्त आणि पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील सध्याच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीअंती शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी म्हणून 10 जुलैपर्यंत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला.
'हे' आहेत आदेश
राज्यावर ओढावलेलं राजकीय संकट पाहता ठाणे जिल्हा प्रशासनाने कलम 144 अर्थात जमावबंदी लागू केले आहेत. जिल्ह्यात 30 जूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या राजकीय मिरवणुकीवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. ठाणे हा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, “लाठ्या किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगणे, पोस्टर जाळणे, पुतळे जाळणे यावर बंदी घालण्यात आली आहे. घोषणाबाजी करणे किंवा स्पीकरवर गाणी वाजवण्यासही परवानगी नाही.