मात्र, ठाणे शहराचा टप्याटप्याने पाणीपुरवठा (water supply) सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे घोडबंदर रोड, पवारनगर, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघबील, कासारवडवली, विजयनगरी, विजय पार्क, राम मंदिर रोड, मानपाडा, टिकुजिनीवाडी, हिरानंदानी इस्टेट, ढोकळी, यशस्वी नगर, मनोरमानगर, माजिवडा, कापूरबावडा या गावांना पाणीपुरवठा होत आहे.
उन्नती, सुरकुरपाडा, जयभवानी नगर, मुंब्रा, रेतीबंदर आदी भागात बुधवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
समतानगर, रितू पार्क, सिद्धेश्वर, आकृती, दोस्ती, विवियाना मॉल, वर्तकनगर, रुस्तमजी, नेहरुनगर आदी भागांना पाणीपुरवठा होणार आहे. किसन नगर-2, जॉन्सन, जेल, साकेत आदी ठिकाणी बुधवारी रात्री 9.00 ते गुरुवारी सकाळी 9.00 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने बंद राहणार आहे.
सदर शटडाऊनमुळे पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याची योग्य साठवणूक करून ठाणे महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.