‘यूडायस-प्लस’वरील नोंदणीनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार, पुण्यात सर्वाधिक 37 शाळांत एकाही विद्यार्थ्याची नोंद झालेली नाही.
रत्नागिरीतील 24, नागपूरमधील 23 शाळाही विद्यार्थ्यांविना आहेत. बुलढाण्यात 21 शाळांत शून्य पटसंख्या आहे.
या आकडेवारीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 713 शाळांची पटसंख्या 10च्या खाली आहे. तसेच पुण्यात 627, रायगडमध्ये 682, तर सिंधुदुर्गमध्ये 569 शाळांत एवढीच मोजकी विद्यार्थीसंख्या आहे.
मुंबई (mumbai) उपनगरांतील 360, मुंबई शहरातील 34, ठाण्यातील (thane) 199 आणि पालघरमधील 124 शाळांतही विद्यार्थ्यांची संख्या 10च्या खालीच आहे.
उर्वरित जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी 200 ते 300, तर काही ठिकाणी 100 ते 150 शाळा अशा श्रेणीत आहेत. राज्यात एकूण सात हजार 946 शाळांत केवळ 1 ते 10 विद्यार्थी नोंदले गेले आहेत.
हेही वाचा