पाणीगळती रोखण्यासाठी पालिका 50 कोटी खर्च करणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबईकरांना महापालिकेकडून पाणीपुरवठा करताना मोठ्या प्रमाणात जलवाहिन्यांमधून पाणीगळती होत असते. तसंच पाणी माफियांकडून होणाऱ्या पाणी चोरीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे पाणीगळती रोखण्यासाठी पालिकेनं मुंबई उपनगरात मोठ्या प्रमाणात कामं हाती घेण्याचं ठरवलंय. त्यासाठी पालिका 50 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीसमोर बुधवारी सादर केला जाणार आहे.

संपूर्ण मुंबईला दरदिवसाला 3 हजार 750 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी 650 दशलक्ष लीटर पाण्याची गळती होत असते. तर 140 दशलक्ष लीटर पाण्याची चोरी होते. त्यामुळे पालिका प्रशासनानं मुंबई उपनगरातील जलवाहिन्यांमधून होणारी पाण्याची गळती थांबवणं, पाणी दूषितीकरण थांबवण्यासह इतर कामं करणार आहे.

पालिका कोणत्या वार्डसाठी किती करणार खर्च?

-के पूर्व विभाग - 6 कोटी 97 लाख रुपये

-पी उत्तर विभाग - 1 कोटी 34 लाख रुपये

-एस विभाग - 5 कोटी 92 लाख रुपये

-एन विभाग - 3 कोटी 6 लाख रुपये

-के पश्चिम विभाग - 11 कोटी 23 लाख रुपये

-आर उत्तर विभाग - 3 कोटी 31 लाख रुपये

-एल विभाग - 7 कोटी 90 लाख रुपये

-एम् पूर्व विभाग - 6 कोटी 7 लाख रुपये

-टी विभाग - 4 कोटी 64 लाख रुपये

पुढील बातमी
इतर बातम्या