कानपूरमध्ये रंगलेल्या वनडेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का देत सीरिजवर आपला कब्जा केला. या सामन्यात निर्णायक भूमिका निभावणाऱ्या रोहित शर्माने धुवादार बॅटिंग करून लोकांची मने तर जिंकलीच, याव्यतिरिक्त त्याने अनेक रेकॉर्ड्सही आपल्या नावे केले.
रोहितने या सामन्यात 138 चेंडूत 147 धावांची धडाकेबाज खेळी केली. इतकेच नाही तर त्याने यावेळी 18 चौकार आणि 2 षटकार लगावत हा सामना जिंकण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याचसोबत त्याने काही रेकॉर्डही आपल्या नावे केले
वनडे सीरिजवर कब्जा केल्यानंतर आता भारतीय संघ न्यूझीलंडविरोधात होणाऱ्या टी-20 सीरिजसाठी सज्ज झाला आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यान टी-20 मालिका 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.