रेल्वे अपघातांचे 17 बळी

मुंबई - मुंबईतील रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांचे सत्र कायम आहे. गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रेल्वे अपघातात 17 जणांचा बळी गेला.

रेल्वे मार्गावर होणारे अपघात कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येतात. पण या अपघातांचे प्रमाण कमी झालेले नाही. सप्टेंबर महिन्यात तर या अपघातांचे प्रमाण अधिकच वाढले आहे. गुरुवारी पुन्हा एकदा रेल्वे अपघामध्ये १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मृतांमध्ये १६ पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून, यामध्ये १३ जण जखमी देखील झाले.

पुढील बातमी
इतर बातम्या