कोरोनाच्या पार्श्वभूमिवर नवनवीन अफवा सोशल मिडियावर पसरवल्या जात आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी सायबर पोलिसांनी आता कठोर पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहेत. व्हॉटस अँप, फेसबुक किंवा अन्य सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता कठोर पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर आतापर्यंत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
महाराष्ट्र सायबर पोलिस सध्या टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. पोलिसांनी विविध जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात आता गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्र सायबर विभाग लॉकडाऊनच्या काळात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये 333 गुन्हे 30 एप्रिल 2020 पर्यंत दाखल झाले आहेत . यातील 13 गुन्हे अदखलपात्र आहेत. या गुन्ह्यांमधे आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 138 गुन्हे दाखल झाले आहेत.आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 125 गुन्हे तर titktok विडिओ शेअर प्रकरणी 10 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 4 गुन्हे व अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 49 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 152 आरोपींना अटक केली आहे .
कुठल्या जिल्ह्यात किती गुन्हे दाखल
त्यामध्ये बीड 29, पुणे ग्रामीण 27, जळगाव 26, मुंबई 20, कोल्हापूर 16, सांगली 12, नाशिक ग्रामीण 12, नाशिक शहर 11, जालना 11, सातारा 10, बुलढाणा 10, लातूर 10, नांदेड 9, पालघर 9,ठाणे शहर 8,परभणी 8, सिंधुदुर्ग 7, नवी मुंबई 7, अमरावती 7, ठाणे ग्रामीण 7, हिंगोली 6,नागपूर शहर 6, गोंदिया 5, सोलापूर ग्रामीण 5, पुणे शहर 4, रत्नागिरी 4 ,सोलापूर शहर 4, नागपूर ग्रामीण 4, भंडारा 3, चंद्रपूर 3, पिंपरी- चिंचवड 3,रायगड 2, धुळे 2, वाशिम 2, औरंगाबाद 1 (एन.सी), यवतमाळ 1 यांचा प्रामुख्याने समावेश आहे .
आतापर्यंत करण्यात आलेल्या अनेक कारवायांमध्ये ग्रुपमधील उपद्रवींकडून पसरवण्यात आलेल्या अफवांना ग्रुप अँडमिनला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच बैजल यांनी व्हाँट्स अँप ग्रुप अँडमिना सध्याच्या पार्श्वभूमिवर त्याच्या ग्रुपमधील सेटींगमध्ये जाऊन ज्या ग्रुपला ते अँडमिन आहेत. त्या ग्रुपवर फक्त तेच मेसेज टाकू शकतील अशी सेटींग करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.