अफवा पसरवणाऱ्यांविरोधात 400 गुन्हे आतापर्यंत दाखल

लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली असून राज्यात आतापर्यंत 400 गुन्हे दाखल केले आहेत. तर या गुन्ह्यात पोलिसांनी 213 जणांना अटक केली असल्याची माहिती सायबर पोलिसांकडून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना. अनेक जण सोशल मिडियावर जाणीव पूर्वक टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर  अफवा पसरवत आहेत. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर महाराष्ट्रतील विविध पोलीस ठाण्यात 400 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात 18 अदखलपाञ गुन्ह्यांचा ही समावेश आहे.
 
 गुन्ह्यांचे विश्लेषण 
 
आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी 170 गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी 158 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी 18 गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 7 गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी 43 गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत 213 आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी 102 आक्षेपार्ह पोस्ट्स काढून टाकल्या आहेत. 
पुढील बातमी
इतर बातम्या