वरुण कश्यप गजाआड

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

आंबोली - गाईच्या चामड्याची बॅग वापरल्याने रिक्षावाल्याने धमकी दिल्याचा कांगावा करणाऱ्या वरूण कश्यपला आंबोली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. दोन धर्मांत तेढ निर्माण केल्याच्या आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

वरुण कश्यप १९ ऑगस्टला सकाळी रिक्षातून कामावर जात होता. त्यावेळी एक रिक्षाचालक गोरक्षकाने गाईच्या चामड्यापासून बनवलेले बॅग वापरल्याच्या संशयावरून धमकी दिल्याची तक्रार केली होती. मात्र वरुण कश्यपची ही तक्रारच खोटी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ज्यावेळी हा प्रकार घडल्याचा वरुणने दावा केला होता, त्यावेळी तो घरी असल्याचे तपासात समोर आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या