करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्य देशांतून येणाऱ्यांना व्हिसा देणे बंद करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी 15 एप्रिलपर्यंत कोणालाही व्हिजा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तर ज्यांनी अर्ज केला आहे. किॆवा ज्यांना तारखा मिळाल्या आहेत. त्यांना ही कार्यालयात न येण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून शहरात 144 अंतर्गत जमावबंदीचे आदेश दिलेले आहेतच, तसेच परदेशातून येणाऱ्यांना ही विलगीकरण कक्षात ठेवले जात होते. माञ परिस्थिती आणखी चिगळू नये म्हणून पोलिसांनी आता परदेशातून भारतात म्हणजेच मुंबईत येणाऱ्यांना आता व्हिजा नाकारला आहे. पोलिसांनी 15 एप्रिलपर्यंत कुणाला ही व्हिजा न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पञक काढून पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे.