बोरीवली - मुंबईत दहशतवाद्यांचे सावट असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबईतल्या अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या समानांची तपासणी करण्यात आली. यावेळी मुंबईकरांनी स्वतःहून पुढाकार घेत जवानांना सहकार्य केले.