आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम

  • कल्याणी उमरोटकर & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

मुंबई - आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण असे कार्यक्रम आजच्या समाजासाठी फार महत्त्वाचे मानले जातात. याच पार्श्वभूमीवर काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एनएसएस कॅम्पचं आयोजन केलं. यात साठे कॉलेजच्या यज्ञेश कदम, डीटीएसएस कॉलेजच्या योगेश मोरे, श्री नारायण कॉलेजच्या सौरभ शिंदे या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी दोन महिन्यात 450 स्वयंसेवकांना संरक्षण कसं करायचं यासाठी प्रशिक्षण दिलं. तसंच काही दिवसांनी पालिका शाळांनाही अशा प्रकारचं प्रशिक्षण देणार असल्याचं या विद्यार्थ्यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या