महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार असून या निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
असा आहे निकाल?
यंदाच्या जुलै-ऑगस्ट २०१८ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागातून १ लाख ०२ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली असून त्यापैकी १ लाख ०२ हजार १६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी फक्त २३ हजार १४० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी २२.६५ टक्के आहे.
नऊ विभागांचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०१८ मध्ये ही परीक्षा घेतली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांचा निकाल एकाच वेळी जाहीर करण्यात आला असून या परीक्षेला मुंबई, ठाणे, पालघर या भागातून एकूण २९ हजार ०५७ विद्यर्थी बसले होते.
मुंबईचा निकाल?
यातील फक्त ५ हजार ६०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबईचा निकाल १९.२७ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली असून जुलै-ऑगस्ट २०१७ ला १८.७४ टक्के निकाल लागला होता.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या २७ ऑगस्टपासून ५ सप्टेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी बोर्डाकडे अर्ज करता येणार आहेत. तसंच २७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या कॉपीसाठी अर्ज करता येणार आहे.
सहा विषयांचं पूनर्मूल्यांकन
यंदाच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना पर्यावरण व श्रेणी विषय वगळून कोणत्याही सहा विषयांचं पूनर्मूल्यांकन करता येणार आहे. याआधी ही सुविधा फक्त तीन विषयांसाठी पूनर्मूल्यांकन उपलब्ध होतं. तसंच जे विद्यार्थी या परीक्षेत अनुउत्तीर्ण झाले आहेत त्यांना फेब्रुवारी-मार्च २०१९ या परीक्षेेसाठी अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार असून या निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
असा आहे निकाल?
यंदाच्या जुलै-ऑगस्ट २०१८ मध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागातून १ लाख ०२ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली असून त्यापैकी १ लाख ०२ हजार १६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी फक्त २३ हजार १४० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी २२.६५ टक्के आहे.
नऊ विभागांचा निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०१८ मध्ये ही परीक्षा घेतली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागांचा निकाल एकाच वेळी जाहीर करण्यात आला असून या परीक्षेला मुंबई, ठाणे, पालघर या भागातून एकूण २९ हजार ०५७ विद्यर्थी बसले होते.
मुंबईचा निकाल?
यातील फक्त ५ हजार ६०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुंबईचा निकाल १९.२७ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली असून जुलै-ऑगस्ट २०१७ ला १८.७४ टक्के निकाल लागला होता.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या २७ ऑगस्टपासून ५ सप्टेंबरपर्यंत गुणपडताळणीसाठी बोर्डाकडे अर्ज करता येणार आहेत. तसंच २७ ऑगस्ट ते १५ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेच्या कॉपीसाठी अर्ज करता येणार आहे.
सहा विषयांचं पूनर्मूल्यांकन
यंदाच्या वर्षीपासून विद्यार्थ्यांना पर्यावरण व श्रेणी विषय वगळून कोणत्याही सहा विषयांचं पूनर्मूल्यांकन करता येणार आहे. याआधी ही सुविधा फक्त तीन विषयांसाठी पूनर्मूल्यांकन उपलब्ध होतं. तसंच जे विद्यार्थी या परीक्षेत अनुउत्तीर्ण झाले आहेत त्यांना फेब्रुवारी-मार्च २०१९ या परीक्षेेसाठी अर्ज करता येणार आहे.