आता 10 वीचा एकही विद्यार्थी नापास नाही !

  • संचिता ठोसर & मुंबई लाइव्ह टीम
  • शिक्षण

यंदाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एकही गुणपत्रिकेवर नापास हा शिक्का राहणार नसल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केलं आहे. कारण जुलै - ऑगस्ट 2016 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर झाला..यावेळी 27.97 टक्के एवढा निकाल लागला आहे. तसेच एटीकेटी सवलतीव्दारे अकरावी प्रवेशासाठी ७८,१५३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर फेरपरीक्षेत तीन किंवा तीन पेक्षा अधिक विषयात अनूत्तीर्ण विद्यार्थी हे कौशल्य विकास सेतू कार्यक्रमासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे जुलै - ऑगस्ट 2016 मध्ये घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेच्या गुणपत्रिकेवर नापास हा शिक्का राहणार नाही..

पुढील बातमी
इतर बातम्या