आवश्यक असल्यास अंतिम वर्षांच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊ : मुंबई विद्यापीठ

 महाविद्यालयांशी सल्लामसलत करून अंतिम वर्षाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना अनुक्रमे गुण देण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.

शहरातील अनेक महाविद्यालयाच्या प्राचाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे की, विद्यार्थी या परीक्षेला येत आहेत आणि ही चांगली बातमी आहे. बहुतांक्ष कॉलेजेस ऑनलाईन परीक्षा घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत तांत्रिक त्रुटी निर्माण होऊ शकतात. म्हणूनच परिस्थितीनुसार ग्रेस मार्क देण्याचा विचार करणं योग्य आहे.

यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारनं ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेण्याचं ठरवलं आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, बहुतेक विद्यापीठे परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार करत आहेत. 

महाविद्यालयांना नमुनेदार एमसीक्यू तयार करण्यास आणि परीक्षेच्या दरम्यान परीक्षेच्या पॅटर्नविषयी समज विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना ती उपलब्ध करुन देण्यास सांगण्यात आलं आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर आहे.

जर महाविद्यालयांनी ग्रेस मार्क देण्याचा निर्णय घेतला तर हे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक असेल.  


हेही वाचा

एकाच वेळी २ परीक्षा; विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण

प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना दिलासा, १०० टक्के उपस्थिती बंधनकारक नाही

पुढील बातमी
इतर बातम्या