महाराष्ट्रातमध्ये कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरस हा विषाणू दिवसेंदिवस आपले जाळे महाराष्ट्रात पसरत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ५२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ५ नागरिक पूर्णपणे बरे झाले आहेत.
कोरोना व्हायरसचा फैलाव अधिक होऊ नये म्हणून राज्य सरकार खबरदारीचे पाऊल उचलत आहे. महाराष्ट्रावर अंशत: लॉक डाऊनची वेळ आली आहे. काही कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम तर काही कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण असं असतानाही नागरिक खबरदारी न घेता बाहेर फिरताना किंवा कामाला जात आहेत. आता सरकारच्या मदतीसाठी बॉलिवूडकर धाऊन आले आहेत. अनेक कलाकारांनी पुढे येत नागरिकांना घरी राहण्याचा, स्वच्छता ठेवण्याचा सल्ला देत आहेत.
यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, कार्तिक आर्यन अशा कलाकारांचा समावेश आहे. चला, तर पाहा हे कलाकार तुम्हाला काय सांगत आहेत.
View this post on InstagramMy Appeal in my Style Social Distancing is the only solution, yet 🙏🏽
A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan) on