येणारा रविवार छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ आणि ‘तू माझा सांगाती’ या मालिकेतील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना रविवारी प्रसारीत होणाऱ्या भागामध्ये मिळणार आहेत.
‘राधा प्रेम रंगी रंगली’त पुढे काय?
कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये प्रेम अजूनही राधाच्या शोधात आहे. प्रेमला आता दीपिका आणि देवयानीचे कटकारस्थान कळलं असून, देवयानीनं राधाला कुठेतरी लपवले आहे हे देखील प्रेमला माधुरीनं सांगितलं आहे. गेल्या काही भागांमध्ये मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना बराच ड्रामा बघायला मिळाला.
माधुरीचं विक्रमला म्हणजेच तिच्या पहिल्या नवऱ्याला अचानक भेटणं असो वा माधुरीसमोर विक्रमने देवयानी आणि विश्वनाथच्या मैत्रीबद्दल खुलासा करणे असो. या सगळ्या घटनांमुळे मालिकेला एक नवं वळण मिळणार आहे, यात शंका नाही.
राधा आणि प्रेमची अजूनही भेट झालेली नसून, माधुरी राधाच्या शोधात असतानाच तिची भेट विक्रमशी झाली जेव्हा ती आनंद नाडकर्णी यांच्या घरी आली. याचदरम्यान माधुरी प्रेमला त्याच्या वडिलांचं सत्य सांगण्यासाठी फोन करते. माधुरी प्रेमला त्याचे वडील विक्रम हे जिवंत आहेत हे सांगते आणि त्या दोघांचे बोलणे देखील करून देते. प्रेमला हे सगळे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो.
हे सर्व घडत असताना विक्रम आणि विश्वनाथचीही भेट आनंद नाडकर्णी यांच्या घरामध्ये होते, बऱ्याच वर्षांपासूनचे घट्ट मित्र पुन्हा एकदा एकमेकांना भेटतात. येत्या महारविवारमध्ये कश्यप नांदेची एन्ट्री होणार असून कोण आहे हा कश्यप नांदे? राधा आणि कश्यपमध्ये काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत.
‘तू माझा सांगाती’त पुढे काय?
‘तू माझा सांगाती’ ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन पोहोचली आहे. जिथे तुकोबांना लागणार आहे विठुरायाच्या दर्शनाची आस पण भक्ताची ही आस भगवंत पूर्ण करणार का? कशी पूर्ण करणार? हा प्रवास आता मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.
येत्या रविवारच्या भागामध्ये विठ्ठल भेटीचा मुहूर्त सुनिश्चित होणार आहे. परंतु, आवलीला याची काही जाणीव नाही. तसंच आवली लवकरच गोड बातमी देणार आहे. एकीकडे अशी आनंदाची बातमी आणि दुसरीकडे विठ्ठल भेटीचा ध्यास तुकोबांच्या मनी आहे. आता तुकोबांना प्रपंचामध्ये अधिक न अडकता परमार्थचा मार्ग निवडायचा आहे.
येणारा रविवार छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. ‘राधा प्रेम रंगी रंगली’ आणि ‘तू माझा सांगाती’ या मालिकेतील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना रविवारी प्रसारीत होणाऱ्या भागामध्ये मिळणार आहेत.
‘राधा प्रेम रंगी रंगली’त पुढे काय?
कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये प्रेम अजूनही राधाच्या शोधात आहे. प्रेमला आता दीपिका आणि देवयानीचे कटकारस्थान कळलं असून, देवयानीनं राधाला कुठेतरी लपवले आहे हे देखील प्रेमला माधुरीनं सांगितलं आहे. गेल्या काही भागांमध्ये मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना बराच ड्रामा बघायला मिळाला.
माधुरीचं विक्रमला म्हणजेच तिच्या पहिल्या नवऱ्याला अचानक भेटणं असो वा माधुरीसमोर विक्रमने देवयानी आणि विश्वनाथच्या मैत्रीबद्दल खुलासा करणे असो. या सगळ्या घटनांमुळे मालिकेला एक नवं वळण मिळणार आहे, यात शंका नाही.
राधा आणि प्रेमची अजूनही भेट झालेली नसून, माधुरी राधाच्या शोधात असतानाच तिची भेट विक्रमशी झाली जेव्हा ती आनंद नाडकर्णी यांच्या घरी आली. याचदरम्यान माधुरी प्रेमला त्याच्या वडिलांचं सत्य सांगण्यासाठी फोन करते. माधुरी प्रेमला त्याचे वडील विक्रम हे जिवंत आहेत हे सांगते आणि त्या दोघांचे बोलणे देखील करून देते. प्रेमला हे सगळे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो.
हे सर्व घडत असताना विक्रम आणि विश्वनाथचीही भेट आनंद नाडकर्णी यांच्या घरामध्ये होते, बऱ्याच वर्षांपासूनचे घट्ट मित्र पुन्हा एकदा एकमेकांना भेटतात. येत्या महारविवारमध्ये कश्यप नांदेची एन्ट्री होणार असून कोण आहे हा कश्यप नांदे? राधा आणि कश्यपमध्ये काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत.
‘तू माझा सांगाती’त पुढे काय?
‘तू माझा सांगाती’ ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन पोहोचली आहे. जिथे तुकोबांना लागणार आहे विठुरायाच्या दर्शनाची आस पण भक्ताची ही आस भगवंत पूर्ण करणार का? कशी पूर्ण करणार? हा प्रवास आता मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.
येत्या रविवारच्या भागामध्ये विठ्ठल भेटीचा मुहूर्त सुनिश्चित होणार आहे. परंतु, आवलीला याची काही जाणीव नाही. तसंच आवली लवकरच गोड बातमी देणार आहे. एकीकडे अशी आनंदाची बातमी आणि दुसरीकडे विठ्ठल भेटीचा ध्यास तुकोबांच्या मनी आहे. आता तुकोबांना प्रपंचामध्ये अधिक न अडकता परमार्थचा मार्ग निवडायचा आहे.