मिठाई खाताना सावधान!

मुंबई - दिवाळी म्हणजे फराळ आलाच. चकल्या, करंज्या वगैरे आपण घरी करतो. पण मिठाईसाठी आपली पसंती दुकानांनाच असते. सणासुदीला मिठाईचे भावही चढे असतात. मग स्वस्त मिठाईचं आमीष कुणालाही आकर्षित करेलच... पण ही स्वस्तातली मिठाई ठरू शकते जीवघेणी...चांदीच्या वर्खाच्या अर्ध्या किंमतीत हे इतर धातूंचे वर्ख मिळतात. त्यामुळे मिठाई स्वस्तात मिळते, पण चांगलीच महाग पडू शकते...तेव्हा, मिठाई घेताना सावधान. दोन पैसे वाचवण्याच्या प्रयत्नात लाखमोलाचा जीव आपण धोक्यात घालत नाही, याची काळजी घ्या...

कशी ओळखाल वर्खातली भेसळ?

अॅल्युमिनियमच्या वर्खाची चमक चांदीपेक्षा जास्त असते

हातावर घेतल्यास चांदीचा वर्ख चिकटून राहतो

इतर धातूंच्या वर्खाचे मात्र तुकडे होतात

पुढील बातमी
इतर बातम्या