कोरोनाचा हाहाकार! चार दिवसात 196 बळी, तर राज्यात 1495 कोरोनाचे नवे रुग्ण

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना, महाराष्ट्रात बुधवारी  कोरोना रुग्णांनी 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.  बुधवारी दिवसभरात 1495 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात 54 जणांचा बळी गेला आहे. तर 422 जणांना बुधवारी घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात कोरोनाने बाधित 25 हजार 922 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.  रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार या चार दिवसात तब्बल  196 जणांचा मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये आता भितीचे वातावरण आहे.

राज्यभरात कोरोनाशी दोन हात करण्यात संपूर्ण प्रशासन व्यस्त आहे. बुधवारी दिवसभरात कोरोनाच्या  2 लाख  30 हजार 857 नमुन्यांपैकी 2  लाख 03 हजार 439 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर  25 हजार  922जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 98  हजार 213 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 14 हजार 627 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोना या महामारीने मृत्य पावलेल्यांची संख्या 975 आता  इतकी झाली आहे.

 बुधवारी मृत पावलेल्या 54 नागरिकांमध्ये मुंबईतील  40, जळगाव 2, पुणे 6  सोलापूर 2  औरंगाबाद 2 वसई-विरार 1 अशी मृतांची संख्या आहे. बुधवारी झालेल्या 54  मृत्यूमध्ये पुरूष 33 आणि 21, महिलांचा समावेश आहे. 60 वर्षे किंवा त्यावरील 29 रुग्ण आहेत तर 21 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षाच्या खालील आहेत. या 54 मृतांपैकी 36 जणांमध्ये (67 टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

कोरोना रुग्णांची विश्लेक्षणांनुसार माहिती

कोरोना बाधित रुग्णांमधील 59 टक्के म्हणजेच 5228 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे विरहित आहेत. 

39 टक्के म्हणजेच 3209 रुग्णांमध्ये सौम्य आणि मध्येम लक्षणे आढळून आली आहेत.

फक्त 5 टक्के रुग्ण गंभीर स्वरुपाचे असून त्यातील 236 म्हणजेच 3 टक्के नागरिकांना आँक्सीजनची आवश्यकता, तर 92 रुग्ण म्हणजेच 1 टक्का रुग्ण व्हँन्टीलेटरवर आहेत. 

 इतर 96 रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या