महडमध्ये जेवणातून ८८ जणांना विषबाधा, ३ बालकांचा मृत्यू

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • आरोग्य

वास्तूशांतीच्या पूजेतील जेवणातून ८८ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार रायगडच्या महडमध्ये समोर आला आहे. यामधील ७ जण रायगड येथील जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात अालं अाहे.  या घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते.

3 जणांना मृत्यूचं आमंत्रण

सोमवारी रात्री महड गावतील गावकरी सुभाष माने यांच्या नव्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता. यावेळी वस्तुशांतीच्या पुजेनंतर सर्वांसाठी जेवणाचंही आयोजन करण्यात आलं होतं. हे जेवण केल्यानंतर रात्री उशिरा घरी परतल्यानंतर या सर्वांना अस्वस्थपणा आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. यामध्ये विषबाधा झालेल्या कल्याणी शिंगुडे (७), ऋषिकेश शिंदे (१२) प्रगती शिंदे (१३) यांना मृत घोषित करण्यात आलं आहे. तर ७ रुग्ण रायगड येथील जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहेत.

जेवणात किटकनाशके ....!

या जेवणामध्ये किटकनाशके मिसळल्याची शक्यता एमजीएममधील डॉक्टरांनी वर्तवली आहे. रायगडचे पोलिस उपअधिक्षक पांढरपट्टे यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण जेवणाची शहानिशा केली असता सर्व जेवण खराब झाल्याचं आढळून आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या