मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दरदिवशी नव्यानं निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या १००० पर्यंत पोहोचली आहे. यादृष्टीनं रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह सोमवारी बैठक आयोजित केली होती. यात महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णालयं, प्रयोगशाळांचे प्रतिनिधी सहभागी होते. लक्षणं नसलेल्या रुग्णांना दाखल करू नये. दाखल रुग्ण आणि उपलब्ध खाटा याची माहिती देणारे डॅशबोर्ड आणि रुग्णालयातील फलक वेळोवेळी अद्ययावत केले जावेत, अशा सूचना यावेळी रुग्णालयांना देण्यात आल्या.
कोरोना बाधितांमधील बहुतांश रुग्ण हे मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू गृहसंकुलातील आहेत. या रुग्णांचा खासगी रुग्णालयांमध्ये दाखल होण्याकडे कल अधिक असतो. त्या दृष्टीने ८० टक्के राखीव खाटा तयार ठेवण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसंच, रुग्णांना महापालिकेच्या नियंत्रण कक्षाद्वारेच दाखल केले जावे.
एखादा रुग्ण थेट रुग्णालयात आल्यास त्याला दाखल केल्याची माहिती संबंधित नियंत्रित कक्षाला तातडीनं कळविणं बंधनकारक आहे. दवाखान्यात लक्षणं असलेली संशयित व्यक्ती आल्यास तात्काळ चाचणी करुन घ्यावी. तसंच, यांचा पाठपुरावा करण्यासाठी व्यक्तीचा पूर्ण पत्ता पिनकोडसह नोंदवावा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. तसंच, चाचणी अहवाल २४ तासांत तयार होईल असे प्रयत्न करण्याची सूचना प्रयोगशाळांना दिली आहे.
खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा अजूनही कोरोनाबाधितांसाठी राखीव आहेत. मधल्या काळात रुग्णसंख्या कमी झाल्याने या खाटा कमी करण्याचा प्रस्ताव आम्ही मांडला होता. परंतु आता रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याने ही मागणी मागे घेतली आहे. खासगी रुग्णालयातील सर्व खाटा सोईसुविधांसह सज्ज आहेत.
खासगी प्रयोग शाळांसाठी आदेश