राम कदम यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर केईएम रुग्णालयाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शुक्रवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांचा असल्याचं राम कदम यांनी ट्टिटमध्ये म्हटलं आहे. केईएममधील रुग्णांच्या अवस्थेवरुन त्यांनी सरकारवर टीका करत जाब विचारला आहे.
केईएम रुग्णालयात रुग्णांना खाली बसण्याची वेळ आली आहे. अनेक रुग्ण जमिनीवर बसले आहेत. त्यांच्या वैद्यकीय सेवेचं काय? काहीच नाही का? अत्यंत दुःखद बाब.. महाराष्ट्र सरकारला कधी जाग येणार? असा जाब त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत विचारला आहे.
महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता
पोलिसांवर हल्ल्याच्या 218 गुन्हे, तर 770 जणांना अटक