महाराष्ट्रात मंगळवारी २ हजार र४०५ नवे रुग्ण आढळले.


राज्यातील करोना संसर्ग अद्याप सुरूच असून आज करोनाबाधित रूग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. कालच्या दिवसभरात राज्यात १ हजार ८४२ नवे कोरनाबाधित रुग्ण आढळले आले होते. आज मात्र ही संख्या २४ तासांत २ हजार २०४ वर पोहोचली आहे. करोनामुळे राज्यात ४७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या २० लाख १३ हजार ३५३ वर पोहोचली आहे.

राज्यात ४३ हजार ८११ सक्रिय रूग्ण आहेत. तर, आतापर्यंत ५० हजार ८६२ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. दिवसभरात महाराष्ट्रात २ हजार १०६ जणांनी करोनावर मात केली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२४ टक्के इतके झाले आहे. आतापर्यंत राज्यात १९ लाख १७ हजार ४५० जणांनी करोनावर मात केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या