ठाणे येथे ६६व्या राज्यस्तरीय पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेत महिला गटातील शिवशक्ती महिला संघ मुंबर्इ शहर संघाने सलग चौथ्यांदा अंतिम विजेतेपद मिळवले आहे. तर, पुरूष गटात उजाला क्रीडा मंडळ ठाणे संघाने सलग दुसऱ्यांदा अंतिम विजेतेपद मिळवले. महिला गटातील अंतिम सामना शिवशक्ती महिला संघ विरुद्ध छत्रपती क्रीडा मंडळ डोंबिवली यांच्यात झाला.
तसेच पुरूष गटात श्रीराम कबड्डी संघाच्या नितीन शेगर याने सामन्यातील पहिली चढार्इ केली. तर, सामन्यातील पहिला गुण उजाला क्रीडा मंडळाच्या अक्षय भोर्इर याने बोनस टाकून मिळवला. सामन्यात उजाला क्रीडा मंडळानं अतिशय आक्रमक खेळ करीत मध्यंतराला 21-7 अशी 14 गुणांची आघाडी घेतली. परंतु मध्यंतरानंतर श्रीराम कबड्डी संघाच्या नितीन शेगर आणि नरेश दिंडले यांनी आक्रमक चढाया करीत भराभर गुण मिळवले.
सामना संपायला शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना उजाला क्रीडा मंडळाकडे फक्त 4 गुणांची आघाडी शिल्लक होती. परंतु, पिंटु पाटीलने पुन्हा आपल्या अष्टपैलु खेळाची चुणूक दाखवत आपल्या संघाचा विजय निश्चित केला. तरी या झालेल्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पौर्णिमा जेधे, शिवशक्ती महिला संघ (मुंबई) आणि अर्चना करडे, छत्रपती क्रिडा मंडळ (डोंबिवली) या मानकरी ठरल्या तर परुष गटात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान श्रीराम कबड्डी संघाचे नरेश धिंडले आणि किरण धावडे यांना मिळाला.