'पोस्टरबाजीच्या राजकारणाचा जमाना गेला'

मुंबई - निरर्थक पोस्टरबाजीच्या राजकारणाचा जमाना गेला. आता जनतेला फक्त विकास हवा आहे अशा आशयाचं पोस्टर भाजपाच्या प्रवक्ता श्वेता शालिनी यांनी लावलं आहे. पण हे सांगण्यासाठीही त्यांनी प्रत्यक्षात पोस्टरचाच आधार घ्यावा लागला आहे.

महापालिका निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपण काय कामं केली हे सांगण्यासाठी पोस्टरबाजी करू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना भवनाजवळ शालिनी यांनी हे पोस्टर लावलंय. मात्र, पोस्टरबाजीचा जमाना गेल्याचा संदेश देणारं हे पोस्टर परिसरात चर्चेचा विषय ठरलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या