अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीला (NCP) रामराम केला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे.
अजित पवार यांना छगन भुजबळ, हसनमुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, अनिल भाईदास पाटील, बाबुराव अत्राम, संजय बनसोडे यांचा साथ आहे.
अजित पवार -उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ – मंत्री
दिलीप वळसे-पाटील-मंत्री
हसन मुश्रीफ- मंत्री
धनंजय मुंडे- मंत्री
धर्मारावबाबा आत्राम-मंत्री
आदिती तटकरे- मंत्री
संजय बनसोडे – मंत्री
अनिल पाटील – मंत्री
अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
अजित पवार नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगली होती. आज सकाळी अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलवली होती.
अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी काही वेळा पूर्वी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी शरद पवारांनी म्हटलं होतं की, मला आजच्या बैठकीचे नियोजन काय आहे माहिती नाहीत पण विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार असल्याचं ते म्हणाले.
मात्र येत्या 6 जुलैला बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता बैठक होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याचंही ते म्हणाले.
दरम्यान, त्यानंतर आता अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
ते म्हणाले की, अजित पवार यांच्या बैठका होतच असतात. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. पण 6 तारखेला महत्त्वाची बैठक होणार आहे. ती नेत्यांची बैठक आहे. मी नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सुप्रिया सुळे मुंबईवरुन पुण्याला यायला निघाल्या आहेत. प्रदेशाध्यक्षपदाविषयी आणि त्या संदर्भात मी 6 तारखेला बैठक बोलावली आहे. ज्यात संघटनात्मक बांधणी करण्यावर चर्चा करणार आहोत. संघटनेत बदल करण्याची गरज आहे का? यावर विचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.